माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका पत्रान्वय खुलासा ट्विट करुन दिला आहे ते पत्र जशाच्या तसे वाचा…
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे.
पुढील महत्त्वाच्या गोष्टीवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून श्री परंबिर सिंह हे कसे खोटे बोलत आहेत ही बाब आपल्या सहज लक्षात येईल. सचिन वाजे यांना अटक झाल्यानंतर परमसिंग एवढे दिवस शांत का बसले होते?त्याच वेळी त्यांनी आपले तोंड उघडले नाही ? आपणास उद्या म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर ते परमबीर सिंग यांनी दिनांक 16 मार्चला श्री. पाटील यांना व्हाट्सअप चॅट करून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळवली हा परमवीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅट च्या माध्यमातून श्री. परमबीर सिंग यांना पद्धतशीरपणे पुरावे जमा करायचे होते याचे उत्तरे मिळवताना श्री परमवीर सिंग हे किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरून आपल्या लक्षात येईल.
परमबीर सिंग एसपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत याचा अर्थ काय 18 मार्च रोजी मी लोकमत च्या कार्यक्रमांमध्ये परमवीर सिंग यांच्या विरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटवले असल्याचे म्हटल्यानंतर परमवीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.
पोलिस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाजे व एसपी संजय पाटील हे परमवीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहे 16 वर्षे निलंबित असलेल्या वाजे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला. परमवीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत. त्यांनी आपल्या आरोप सिद्ध करावे मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे.स्वतःला वाचवण्यासाठी परमवीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत.
सचिन वाजे यांनी जर फेब्रुवारीमध्ये परमवीर सिंग यांना भेटून हे सर्व सांगितले की परमवीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का बसले होते?,स्फ़ोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमवीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास लावण्यासाठी परमवीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे माननीय मुख्यमंत्री यांनी परमवीर सिंग यांच्या आरोपांची निपक्षपाती चौकशी करावी.