मुंबई – राज्यात आदिवासी कोट्यातून रिक्त झालेल्या ८५ हजार जागांवर शिकलेल्या आदिवासी तरुणांचा हक्क आहे. राज्यकर्त्यांची मानसिकता सामाजिक न्यायाची नाही. आदिवासी तरुण जर रस्त्यावर उतरले नाही तर या ८५ हजार जागांवर पाणी सोडावं लागेल हे त्यांनी ध्यानात घ्यावं. रस्त्यावर या, आम्ही तुमच्या सोबत आहोत.असं अवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी आज आपल्या ट्विटर हॅण्डलवरून केले.
ट्विट करतांना पुढे प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे की,राज्य शासनाने आदिवासी कोट्यातून भरती झालेल्या,परंतु जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या ८५ हजार लोकांना काढून टाकले. या जागांवर आदिवासींची भरती झाली पाहिजे. तसे केले तर ८५ हजार आदिवासी कुटुंबाना आर्थिक स्थैर्य मिळेल.पण,मग आमची उंबरठी कोण झिजवणार? हा प्रश्न इथल्या सरंजामशाही राज्यकर्त्यांना पडत असावा अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली आहे.