चाळीसगाव (प्रतिनिधी)- कोळी बहुल समाज (जमात) असलेल्या तालुक्यातील दसेगाव बु।। येथील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी या वेळेस अनुसूचित जमाती राखीव जागांसाठी एकही उमेदवार अर्ज जातीच्या दाखला अभावी इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले नाहीत.
वर्षानुवर्षे चालत आलेली ग्रामपंचायत सदस्य साठी निवडणूक गावातील सदस्य अर्ज दाखल करतात परंतु सरकारचे आडमुठे धोरण आणि प्रशासकीय दिरंगाई यामुळे आदिवासी बहुल असलेला कोळी समाज बिना दाखल्याचे जीवन जगत आहे, आदिवासी असूनही जातीच्या दाखल्या अभावी इच्छा असतांनाही निवडणूकीत अर्ज दाखल करता येऊ शकला नाही.तरी प्रशासनाने, स्थानिक खासदार उन्मेश पाटील,स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रकरणी लवकरच लक्ष घालून समाज बांधवांना न्याय मिळवून द्यावा तसेच केंद्र सरकारच्या २०११ च्या जनगणनेनुसार चाळीसगाव तालुक्यातील दसेगाव बु।। आणि इतर ५ गावे हे अनुसूचित जमातीचे राज्य सरकारच्या पेसा कायदा अंतर्गतग येत असूनही समाजाला जातीच्या दाखल्यापासून वंचित आहेत तरी प्रशासनाने आणि स्थानिक खासदार आणि आमदार यांनी लक्ष द्यावे नाही तर येणाऱ्या सर्व निवडणुकीत सर्व कोळी समाज बांधव दसेगावातील तसेच सर्व तालुक्यातील ४०हजार कोळी बांधव येणाऱ्या निवडणूकीत बहिष्कार टाकेन अशी मागणी वजा इशारा गावातील जेष्ठ नागरिक बापू सौंदाणे,आधार आण्णा सौंदाणे, सुकलाल सौंदाणे, माजी सरपंच राजधर सौंदाणे, माजी सरपंच नंदूआण्णा सौंदाणे, बापू मासरे, चिला सौंदाणे, युवराज सौंदाणे, महेंद्र सौंदाणे, संतोष सौंदाणे,छोटू सौंदाणे, प्रकाश मासरे, संजय नवसारे, योगेश सौंदाणे,कैलास मासरे, अनिल सौंदाणे, मोतीलाल सौंदाणे, राजू नेवरे, सुनील नेवरे, नितीन निकुंभ, विनोद चव्हाण यांनी केली आहे.