जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सहाशे कोटी रुपयाच्या जमिनीवर आ.गिरीश महाजन यांचा डोळा असून महाजनांचे मित्र खटोड आणि झंवर यांना जमिनीचे व्यवहार चांगलेच समजत असल्याचा गंभीर आरोप अॅड. विजय भास्कर पाटील यांनी आज दि.19 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
काल माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी मविप्र प्रकरणी संबंध नसतांना खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला होता. त्यास उत्तर देण्यासाठी आज अॅड. विजय भास्कर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलतांना अॅड. विजय भास्कर पाटील म्हणाले की, महाजन यांनी जामनेर येथील जैन समाजाची शिक्षण संस्था हडप केली. जामनेर येथील उर्दू शाळेच्या जागेवर बीओटी कॉम्लेक्स बांधले तर पहूर येथील लेले विद्यालय असलेल्या संस्थेत प्रवेश केला असून तिथं ते विद्यमान अध्यक्ष देखील आहेत. त्याचबरोबर चाळीसगाव येथील राष्ट्रीय विद्यालयाची जमीन विकत घेतली. आणि याच प्रमाणे मविप्र संस्थेची सहाशे कोटी रुपायाची जामीन हडप करण्याचा महाजनांनी प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
तर विरोधकांवर कलम-३०७ लावणे हा गिरीश महाजनांचा पॅटर्न असून त्यांच्याच कृपेने माझ्यावरही कलम ३०७ प्रमाणे खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि मी अकरा दिवस जेल मध्ये होतो.गिरीश महाजन राज्यातील तत्कालीन सरकारमधील प्रभावी मंत्री असल्याने पोलीस महाजनांचे हस्तक होते त्यांनी पोलीस यंत्रणेचा गैरफायदा घेतला आहे.
मी खोटी तक्रार दिली नसून पोलीस तपासात सर्व सत्य समोर येईल राहिला सीडीआर तपासण्याचा विषय तर माझे मोबाईलचे देखील सीडीआर खुशाल तपासावे असं म्हणत महाजनांच्या सीडीआरमध्ये जुही, मोना,स्वीटी,डॉलीचे संदर्भ आढळतील असा गंभीर आरोप यावेळी विजय पाटील यांनी केला असून गिरीश महाजनांच्या विरूध्दचे पुरावे सीडी व पेन ड्राईव्हमध्ये आहेत आवश्यकतेनुसार सर्व देईल असंही विजय पाटील यांनी यावेळी सांगितले.