जळगाव, (प्रतिनिधी) -भाई हिराचंद रायसोनी पतसंस्था प्रकरणी जळगावात आर्थिक गुन्हे शाखेने धाडी टाकत कारवाई केली होती याप्रकरणी चौकशी सुरु आहे अंदाजित अकराशे कोटींचा भ्रष्टाचार आहे, यात मोठे राजकीय लोकांचा व माजी मंत्र्यांच्या संपर्कातील आहे. यावेळी आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी सुरु आहे. त्यामुळे मर्यादा आहेत. चौकशीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे बऱ्याच गोष्टी चौकशीअंती समोर येईल असं माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.यात मोठे राजकीय मंडळी आहे एवढं सांगत यावेळी मात्र खडसेंनी आमदार, खासदार, माजी मंत्री यांचं नावं घेणं टाळलं आहे.
एकनाथ खडसे यांना आपली बीएचआर प्रकरणी शासनाकडे तक्रारी आहे का याबाबत विचारणा केली असता खडसे म्हणाले की गेल्या तीन वर्षांपासून तक्रारी केल्या आहेत. खा. रक्षाताई खडसे यांच्या लेटरहेडवर सुद्धा दिल्लीला तक्रारी केल्या आहे. त्यासोबतच वकील कीर्ती पाटील यांनी तक्रारी केल्या होत्या. जवळपास सोळा ते सतरा तक्रारी होत्या मात्र गेल्या सरकारनं कारवाई थांबवून ठेवली होती असंही खडसे यांनी बोलतांना सांगितलं.
एक दोन दिवसात आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी संपल्यावर एकनाथ खडसे सर्व रेकॉर्ड देणार असल्याचं सांगितलं होतं मात्र चौकशी लवकर संपणार नसल्याने बीएचआर संदर्भात गेल्या तीन वर्षात शासनाकडे केलेल्या तक्रारी, व पत्रव्यवहाराची माहिती खडसे यांनी यावेळी दिली.
गेल्या सरकारनं चौकशी दडपली
सन 2018 पासून वकील कीर्ती पाटील व आम्ही तक्रारी करुन ठेवीदारासाठी न्याय मागत होतो मात्र गेल्या सरकारनं चौकशी थांबवून ठेवली होती असंही खडसे यांनी सांगितलं.
ठेवीदारांना न्याय मिळेपर्यंत लढणार
गेल्या तीन वर्षांपासून ठेवीदारांना ठेवी परत मिळण्यासाठी लढत आहे यापुढेही ठेवीदारांना न्याय मिळण्यासाठी लढत राहू असं एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.