मुंबई,- आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही,आमचं हिंदुत्व सोयीचं नाही, आमचं हिंदुत्व आमच्या धमन्यांमध्ये आहे.हिंदुत्व म्हणजे मंदिरातले घंटे वाजवणे नाही… हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का? असा चिमटा घेत विरिधकांवर हल्लाबोल केला. सामनाचे कार्यकारी संपादक तथा खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या धमाकेदार मुलाखतीवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलंय का? या प्रश्नावर उत्तर देतांना ते बोलत होते.
राज्य सरकारला झालेल्या वर्षपूर्तीनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. संजय राऊत यांनी काल या मुलाखतीचा प्रोमो शेअर करून ‘उद्या धमाका’ असं ट्विट करून उत्सुकता वाढवली होती.हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजपसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.