औरंगाबाद : शहरात राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी अलीकडेच पक्षाने काही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली. या नेमणुकीमुळे पक्षात नाराजांची संख्या वाढली. पक्षाचे वरिष्ठ नेते नाराजीची साधी दखलही घेत नसल्याचे लक्षात आल्यावर औरंगाबाद मध्य मतदारसंघातील अध्यक्ष तथा माजी नगरसेवक इलियास किरमाणी, माजी नगरसेवक खाजा शरफोद्दीन, नासेर चाऊस यांनी गुरुवारी वंचित प्रवेश केला. त्यामुळे पक्षाला शहरात मोठे खिंडार पडले आहे. भाजपपाठोपाठ आता वंचितमध्येही मोठी मेगाभरती सुरू झाली आहे