राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले सर्व धार्मिक स्थळं पाडव्याला उघडण्याचा राज्य सरकारनं योग्य वेळी निर्णय घेतला आहे. धार्मिक स्थळं उघडल्याचं श्रेय भाजप पेढे वाटून घेत आहे. नेहमी प्रमाणे इथंही भाजपने श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असा टोला आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून लगावला आहे.
पुढे आमदार रोहित पवार म्हणाले आहे की, धार्मिक स्थळं उघडण्याबाबत सरकारनं योग्य वेळी निर्णय घेतला असून कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सहकार्य करणारी आध्यत्मिक, धार्मिक क्षेत्रातील मंडळी, भाविक व जनतेचा विजय आहे.