मुंबई, – रिपब्लिक भारत टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून मुंबई पोलिसांनी नव्याने एफआयआर नोंदविला आहे.यामुळे अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ झाली.
आत्महत्येच्या आरोपाखाली त्याला बुधवारी सकाळी मुंबई पोलिसांनी अटक केली. इंटिरियर डिझायनरच्या आत्महत्यास जबाबदार असल्याच्या आरोपाखाली अटक केल्याच्या काही तासांतच मुंबई पोलिसांनी त्याच्याविरोधात बुधवारी संध्याकाळी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी नवीन एफआयआर नोंदविला आहे.
नवीन एफआयआरमध्ये भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या 353, 504, 506 आणि 34 कलम अन्वय गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान काल न्यायालयाने अर्णब यांना पोलीस कोठडी नाकारून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. आज अर्णब गोस्वामींच्या जामिनावर सुनावणी होणार आहे.