कानळदा — शेतकऱ्यांनी आपली विम्याची रक्कम वेळेत भरून देखील आपल्या हक्काची विमा नुकसान भरपाई मिळाली नाही कारण राज्य शासनाने आपली जबाबदारी पार पाडली नाही आणि आपल्या हिस्स्याची विम्याची रक्कम भरली नाही. यामुळे शेतकऱ्याना नुकसान भरपाई मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे. राज्य शासनाने आपली १२६ कोटी रुपयांची रक्कम भरली असती तर आज शेतकरी बांधवांची दिवाळी अंधारात गेली नसती. असा घणाघात करीत खासदार उन्मेश दादा पाटील यांनी या राज्य शासनाच्या नाकर्तेपणा विरोधात नऊ तारखेला आंदोलन करावयाचे असून आपण मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन केले आहे..आज कानळदा येथील विकासो कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते. याप्रसंगी किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे यांनी शेतकरी बांधवांनी आपल्या वर सातत्याने होत असलेला अन्याय आता सहन करायचा नाही. असे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सभापती जिप सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, लोकसभा विस्तारक सचिन पान पाटील,भाजप तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, पंचायत समितीचे सदस्य हर्शल चौधरी, माजी विकासो चेअरमन ज्ञानदेव येवले आदी मान्यवर उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.