मुंबई, – इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी रिपल्बिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना आज अटक केल्यानं भाजपनं ठाकरे सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.
अर्णबच्या अटकेनंतर भाजपच्या केंद्रीय नेत्यांपासूनं तर थेट राज्यातल्या भाजपा नेत्यांनी चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. यामुळे राज्यभरात जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे.
अर्णब गोस्वामी अटक करण्यामागे हे आहे कारण…
मुंबईतील इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले होते. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामीसह आणखी दोन पत्रकारांची यांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाउसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची आई कुमुद नाईक यांचाही मृतदेह तेथेच आढळून आला होता. अन्वय यांची कॉनकॉर्ड कंपनी इंटेरिअर डिझायनरचे काम करत होती. अन्वय यांच्या कंपनीने रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्यासाठी काम केले होते. केलेल्या कामाचे पैसे त्यांच्याकडून सातत्याने अन्वय यांनी मागितले होते. मात्र अर्णब गोस्वामी व त्यांच्या दोन मित्रांनी पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. तर दुसरीकडे अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून माल उचलला होता त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता, परंतु समोरून पैसे येत नसल्याने अन्वय यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.या दाखल गुन्ह्यांमुळेच अर्णब यांना अटक केली असल्याचं समजते. तर या अटकेशी सरकारचा काही संबंध नसल्याचं खा.संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.