मुंबई, – मेट्रो ३ कारशेड कांजुरमार्गला हलविण्याच्या निर्णयावर ठाकरे सरकारवर भाजपकडून जोरदार टीका होतं असतांना महाराष्ट्राच्या ‘सातबारा’ वर दिल्लीचे नाव कोणी लावले? असा सवाल भाजपाला संजय राऊतांनी आज ट्विट करुन विचारला आहे.
मेट्रो ३ कारशेड कांजुरमार्गला हलविण्याच्या निर्णयामुळे ५ वर्षांचा विलंब आणि रुपये ५००० कोटी अधिक खर्च होणार आहे. याची जाणीव ठाकरे सरकारला होती/आहे. या वास्तविकतेपासून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी ठाकरे सरकारची नवीन “स्टंट बाजी” असून ठाकरे सरकार फसवाफसवी करत असल्याचा आरोप करीत जोरदार टिकाश्र खा. डॉ. किरीट सोमय्या यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केले होते. त्याच बरोबर भाजपा कडून या प्रकरणी वारंवार आरोप,टिकाश्र होतं असल्यानं त्याला उत्तर देतांना शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून उत्तर दिले आहे.
खा. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की,
महाराष्ट्राच्या ‘सातबारा’ वर दिल्लीचे नाव कोणी लावले?
मुंबईची इंच इंच जमीन फकत महाराष्ट्राचीच. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र एकजुटीने ऊधळून लावूया.
जय महाराष्ट्र!!