चाळीसगाव -( किशोर शेवरे) मन्याड धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले असल्याने चाळीसगाव पाटबंधारे विभागा तर्फे ३ आवर्तने सोडण्यात येणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातुन प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र मन्याड धरणातून ३ आवर्तन सोडुन शेतकऱ्यांना कोणताच लाभ होणार नसल्याने ३ पेक्षा अधिक आवर्तने सोडल्यास शेती पिके येउन शेतकऱ्यांना समाधान होईल म्हणून ३ पेक्षा अधिक आवर्तने सोडण्यात याव्यात यासाठी नायब तहसिलदार ढवळे यांना दि २ रोजी मन्याड गिरणा समितीच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
मन्याड धरणातून ३ आवर्तन सोडल्यास शेती पिकाना पुरसे पाणी मिळणार नसल्याने आलेले पिके डोळ्या देखत जळाल्यास हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाईल आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांना शेती पिकांना ३ पेक्षा वाढीव आवर्तने सोडल्यास शेतकऱ्यांचे रब्बी पिके येउन शेतकऱ्यांना मोठा लाभ होऊन शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटून रब्बी हंगाम चांगला झाल्यास शेतकऱ्यांच्या घरात दोन पैसे मिळून शेतकऱ्यांच्या काही प्रमाणात असलेल्या अडचणी सुटण्यास मदत होणार आहे . ३ पेक्षा अधिक आवर्तने सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाला नियोजन करण्यासाठी तहसीलदारानी सूचना कराव्यात या मागणी साठी मन्याड गिरणा समितीच्या वतीने नायब तहसील ढवळे यांना दि २ रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर भरत रणदिवे,तुषार निकम ,गणेश पवार,परशुराम पाटील,संजय पाटील,चेतन पाटील,रूपेश पाटील,बापू माळी ,बाळासाहेब पाटील,बाळु पवार यांच्या सह्या आहेत.