- या आधीही सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते
- जलसंधारण व जलव्यवस्थापन साठी झाली निवड
गौरवकुमार पाटील / अमळनेर
पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत राज्यात चमकदार कामगिरी करणारे आनोरे गावाला देशात तिसरा क्रमांक पटकावला असून त्याबाबतची माहितीचा मेल अमळनेर पंचायतला प्राप्त झाला आहे सण २०१९ या वर्षा साठीचा हा पुरस्कार दिल्ली मंत्रालयातुन ऑनलाईन पध्दतीने ११ नोव्हेंबर रोजी वितरित केला जाणार आहे यामुळे तालुक्याचा व आनोरे गावाचा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून गावातील जलयोध्यानी फटाके फोडून आनन्द व्यक्त केला.
पाणी टंचाईग्रस्त असलेल्या आनोरे गावाला नेहमी पाण्याची टंचाई तुन मुक्त करण्यासाठी महिलांसह आबालवृद्ध मंडळींनी कंबर कसून श्रमदानातून जलक्रांती करण्याचा संकल्प केला आणि पुरस्कारासाठी नाहीतर आपल्या गावासाठी व कुटुंबासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन वृक्षारोपण ,जलव्यवस्थापन करून पाणी टंचाईतून मुक्ती मिळवून गाव टँकर मुक्त केल्याने सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धेत राज्यस्तरीय तिसरे बक्षीस मिळाले त्यातून अधिक प्रेरणा घेऊन उत्साहित होऊन सर्व ग्रामस्थांनी एकवटून एकमुखाने निर्णय घेतला व प्रत्येक घरातील वातावरण जलव्यवस्थापन साठी निर्माण होऊन सामाजिक व प्रबोधन पर राष्ट्रीय संदेश भिंतीवर रेखाटले पाणी बचत ,पाणी अडविणे , आगपेटी मुक्त शिवार ,वृक्षारोपण-संगोपन ,सांडपाणी व छताचे पाणी वाया न घालता शोष खड्यातून जमिनीत जिरवणे , गावातून व शेतीशिवारातून वाहून जाणारे पाणी जमिनीत १०० टक्के मुरविणारे व वाटर हार्वेस्टिंग करणारे महाराष्ट्रात पहिले गाव ठरले ,
आनोरे ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्न करून परिश्रमाने श्रमदान करून शेती बांध बंदिस्त करून जलसंधारण व मृदा संवर्धन करीत एकाच वेळी मोठ्या संख्येने सहभागी होत मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून अनोख्या पायंडा निर्माण केला , बांधावर ,रस्त्यावर व प्रत्येक घराचे समोर झाड लावून वृक्षारोपण व संवर्धन ही करण्यात गावाचा अग्रक्रम आहे , असे करीत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून लॉक डाउन मुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी नागरिकांना भाजीपाला पुरवून जनसेवा ही केली तर तर श्रमदानातून जलव्यवस्थापन करीत विहिरींची भूजल पातळी वाढवून गावात बागायती शेती करून समृद्धी कडे वाटचाल सुरू झाली आहे.
याचाच सखोल विचार व सर्वेक्षण जलविज्ञान व जलमंत्रालयाने केल्याने व आनोरे गावी जलशक्ती मंत्रालयाचे केंद्रीय भुजल बोर्डाचे वैज्ञानिक आतिरा आर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून तसा अहवाल सादर केल्याने सण २०१९ चा राष्ट्रीय जल पुरस्कार साठी देशातून अमळनेर तालुक्यातील आनोरे दुसरा क्रमांक पटकावला असून ऑनलाईन पध्दतीने ११ नोव्हेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहितीचा मेल पंचायत समितीला प्राप्त झाला असल्याने या बाबत आनोरे गावात फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.