मुंबई, – केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची राज्याकडून अंमलबजावणी होत असतांना सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे 400 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप आज विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी केला असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांना पत्र देखील दिले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी थोड्यावेळापूर्वी ट्विट करून दिली.
याप्रकरणाची चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे.