रावेर :- रावेर तालुक्यातील बोरखेडा गांवी हत्याकांडातील पीडित परिवाराची रिपाइं तर्फे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी व पदाधिकारी यांनी सांत्वन भेट घेतली.
पीडित कुटूंबातील व्यक्तींशी चर्चा करून चर्चे अंती रावेर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी आयजी यांच्याशी सदर विषयावर चर्चा करून आरोपींना पोलिसांनी तात्काड अटक केल्या बद्दल अभिनंदन पर शुभेच्छा ही देण्यात आल्या. ,निवेदनात सदर पीडित कुटूंबास राज्य शासनाने तात्काळ मदत ५ लाख आणि त्यांच्या कुटूंबाचे पुनर्वसन करून त्यांना स्वतःचे घर व शेती समाज कल्याण विभागा मार्फत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर मांगणी मान्य न झाल्यास रिपाइं तर्फे २३/१०/२०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.सदर निवेदन रिपाइंचे उत्तर
महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, प्र.अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांचे आदेशांन्वयं जिल्हाध्यक्ष राजुभाई सूर्यवंशी,जिल्हा सरचिटणीस मिलींद तायडे ,युवा जिल्हाध्यक्ष रवि सपकाळे ,जिल्हा सचिव प्रकाश सोनवणे,युवा कार्याध्यक्ष गिरीष तायडे,रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष युवराज सोनवणे, यांनी दिले यावेळी रावेर तालुकाध्यक्ष विक्की तायडे,ग्रा. तालुकाध्यक्ष एकनाथ गाढे,युवा तालुकाध्यक्ष कमलाकर गाढे,सतिष निकम ,भीमराव तायडे,किरण ढिवरे, भिका गाढे,राहुल लहासे, नूरमोहम्मद तडवी,समाधान गाढे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.