- मुक्ताईनगर विधानसभेची जागा शिवसेनेला सोडण्याकरिता वरिष्ठ नेत्यांकडे योजना आखली जातेय का ?
जळगाव – मुक्ताईनगर नगर येथील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्यासाठी खूपकाही द्यायचे असून त्यांच्या कार्याची नोंद शिवसेनेकडे असून त्याची दखल घेतली जाईल असे जळगाव येथे आज दि.17 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलतांना शिवसेना नेते खा.संजय राऊत बोलत होते.यामुळे आगामी निवडणुकीत मुक्ताईनगर विधानसभेची जागा शिवसेनेला सुटणार असेच संकेत मिळाले आहे.जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील असेही खा.राऊत म्हणाले.युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आज दि. 18 जुलै पासून जन आशिर्वाद यात्राचे आयोजन करण्यात आले आहे. या जन आशीर्वाद यात्रेतून अख्खा महाराष्ट्र “भगवामय” करणार असल्याचे ते यावेळी बोलत होते.
मुक्ताईनगर मधून आ.एकनाथराव खडसे यांच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढविणारे शिवसेनेचे जिल्हानेते यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष संधी देणार का असे पत्रकारांनी विचारले असता खा.राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या कार्याची शिवसेनेकडे नोंद आहे.शिवसेना कधीच कार्यकर्त्यांचे कार्य, मेहनत, त्याग विसरत नाही.त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना खूप काही द्यायचे आहे.असे खा.राऊत यांच्या बोलण्यातून वरिष्ठ पातळीवर मुक्ताईनगर विधानसभा शिवसेनेला सोडण्यात यावी या विषयावर चर्चा सुरु असल्याचे संकेत मिळाले आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा होता.परंतु गेल्या निवडणुकीत सेनेचे सुरेशदादा जैन निवडणूक वेळी कारागृहात असल्याने त्यांचा पराभव झाला व या जागेवर भाजपचे सुरेश भोळे (राजूमामा) निवडून आले.परंतु या जागेवर पुन्हा शिवसेनेने दावा केला असता ना.गिरीश महाजन यांनी जळगाव शहराचे आमदार “राजूमामाच” राहतील असे जाहीर करून टाकल्याने ही जागा तरी शिवसेनेच्या वाट्याला येणार नाही हे स्पष्ट झाले आहे. मात्र या जागेऐवजी मुक्ताईनगर विधानसभेची जागा शिवसेना आपल्या कडे खेचण्याचा पूर्ण तयारीत असू शकते व भाजपा देखील ही जागा शिवसेनेला सोडून नाथाभाऊंना जळगाव जिल्ह्यातील “अडवाणी” करतील की काय असाच प्रश्न पडला आहे.गेल्या चार वर्षात नाथाभाऊ वर स्वतःच्या पक्षाकडून अन्याय होत आला आहे हे सर्वश्रुत आहे.माझ्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी अनेक वेळा जाहीर पणे बोलून पण दाखवली आहे. वरिष्ठ पातळी वरून आपले तिकीट कापले जाऊ शकते याची नाथाभाऊंना कल्पना आली असेलच त्यामुळे नाथाभाऊ यांनी काही दिवसापूर्वी विधान केले होते की नाथाभाऊला तिकीट मिळो अगर ना मिळो…जनतेची साथ नाथाभाऊला कायम आहे.हे ऐकुन अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.परंतु आज खा.राऊत यांनी न बोलताच मुक्ताईनगर विधानसभेची जागा शिवसेनेला मिळण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्लॅन आखण्यात येत असून लवकरच निर्णय जाहीर होणार असे संकेत मिळाले आहे.मुक्ताईनगर विधानसभेची जागा
ज्या माणसाने पक्षाच्या विचारासाठी युती तोडली जळगाव शहरांमध्ये सत्ता संपादन करण्यासाठी महानगरपालिका इलेक्शन मध्ये त्यांनी युती न केली त्यांचा हा निर्णय योग्य राहिला तर युती झाले असती तर त्यांचेही उमेदवार पडले असते या माणसाने आयुष्यभर पक्षासाठी काम केले पक्षाने काय दिले त्यांना