रावेर, (प्रतिनिधी) – रावेर पासून तीन किलोमीटर अंतरावरील पुनखेडा हे गाव असून या गावावरूनचं नवीन पातोडी, जुनं पातोडी, खिरवड, दोधा, नेहता, निमभोरा सिंम, नांदु पिंपरी हून मुक्ताईनगर तसेच अंतुली हून मध्य प्रदेशात दररोज मोठ्या प्रमाणात जड वाहनांनी, सह चारचाकी,दु चाकी,सह शेतकरी वर्गाकडून ट्रक, ट्रक्टर,रिक्षा बैलगाडी , बस वाहतूक चालते, पण गेल्या अनेक वर्षांपासून या नदीच्या पात्रातील पुलांचा भराव अनेक वर्षांपासून वाहून गेला आहे, वरील बाजूसही दराडे पडली आहेत, यामुळे पुलावरून जड वाहतूक बंद आहे, पण पावसाळ्यात या परिसरातील शेतकरी, गावकरी, मध्य प्रदेशातील लोक, मुक्ताईनगर तालुक्यातील खेड्यापाड्यात लोकांना सह विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागते, विशेष जिव धोक्यात घालून रहदारी करणं भाग पडतं आहेत, परिणामी हे खूप धोकादायक ठरू शकते, कारण ह्या पुलाच्या बाजूला मोठं मोठें खड्डे पडले आहेत, यामुळे भर पावसात पाण्याचा अंदाज चुंकला तर मोठी जिंवत हानी होऊ शकते, या बाबतीत संबंधित गावकऱ्यांनी खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या कडे खूप चं विनंत्या, अर्ज फाटे, तोंडी सुचनाही केल्या आहेत, तरी पुनखेडा वासींयाच्या पदरी निराशाच आली आहे, हे लोकप्रतिनिधी नेहमीच वेळ मारु नेत आहेत, तसेच अधिकारी सुध्दा गोल मोल करून पुनखेडा वासींयाच्या भावना शी खेळतं आहे, असे या परिसरातील गावांमध्ये चर्चा आहे, पण आता तरी लोक प्रतिनिधी, अधिकारी संवेदनशीलता दाखवून जबाबदारी कर्तव्य पार पाडतील व पुनखेडा पुल नवीन बांधकाम लावतील अशी भाबडी आशा सर्व सामान्य माणूस धरून जीव मुठीत धरून दररोज रहदारी धोका पत्करून करतं आहे, या पुला खाली मागच्या पावसाळ्यात दोन घोडेवाले बंधूंनी जीव गमावला आहे
तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी त्यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट करावी, ही जनमानसात ओरड सुरू झाली आहे.