६ लाख १३ हजार व्यक्ती क्वारंटाईन; विविध गुन्ह्यांसाठी ७ कोटी ८३ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई दि.१७ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ८९ हजार ३८४ पास पोलीसांमार्फत देण्यात आले आहेत. ६ लाख १३ हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १६ जून या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख ३१ हजार ३७७ गुन्हे नोंद झाले असून २७ हजार ३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ७ कोटी ८३ लाख १३ हजार ९०१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २६८ (८५१ व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०३ हजार ६३५
राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ६ लाख १३ हजार ९२८
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५
जप्त केलेली वाहने – ८२ हजार ८२०
परदेशी नागरिकांवर व्हिसा उल्लंघनाचे नोंदवलेले गुन्हे – १५
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ४५
(मुंबईतील २९ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३०, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण१,पालघर १)
कोरोना बाधित पोलीस – १२८ पोलीस अधिकारी व ९०५ पोलीस कर्मचारी
राज्यातील एकूण रिलिफ कँप -१२२ (सुमारे ४ हजार १८६ लोकांची व्यवस्था)