जळगाव, (प्रतिनिधी ) खत वाटप योजना सन २०२०-२१ अंतर्गत आज दिनांक 4 जुन रोजी जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभ असते धरणगाव तालुक्यातील शेतकरी गटांना बांधावर खत वाटप योजना सन २०२०-२१ अंतर्गत बांधावर खत व बियाणे वाटप करणाऱ्या गाड्यांना पाळधी गावात हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांशी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी संवाद साधला व बांधावर खत वाटप योजनेबाबत चर्चा केली व भविष्यात सर्व खरेदी ही गटांमार्फत व्हावी जेणेकरून शेतकऱ्यांना शेतमाल बाजार किमतीपेक्षा कमी भावात व घरपोच मिळेल तसेच कोरूना संसर्गाचा धोका कमी होईल असे शेतकऱ्यांना आवाहन केले. कार्यक्रम वेळी उपस्थित पाळधी मधील कृषी सेवा केंद्र प्रतिनिधींशी पालकमंत्र्यांनी चर्चा केली व कृषिमाल पुरवठा तसेच बांधावर खत वाटप योजनेत त्यांनीदेखील हातभार लावावा असे आवाहन केले. सदर कार्यक्रमास तालुक्यातील सभापती पंचायत समिती मुकुंदराव नन्नावरे, गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील कृषी सेवा केंद्र मालक उदय झवर, सचिन पाटील, सतीश बोरसे, तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी व कृषी पर्यवेक्षक ईश्वर पवार यांनीदेखील उपस्थिती होते.