उपक्रमासाठी रा.स्व.सं.संचलित निरामय सेवा संस्थेच्या वतीने 10 पीपीई किट उपलब्ध
रावेर, (प्रतिनिधी) -कोरोनारूपी जागतिक संकटाला रोखण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रावेर व श्रीराम फाउंडेशन रावेर यांच्या वतीने आज जनजागृती करण्यात आली .रावेर तालुक्यातील काही गाव व रावेर शहरातील विविध वस्ती मध्ये जाऊन गेल्या 6 दिवसा मध्ये 19530 लोकांना पर्यत जण जागृती करण्यात आली. व सोबत अभाविप कार्यकर्ते कोविड -19 बद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहे . अभाविप व श्रीराम फाउंडेशन रावेर यांच्या वतीने सेनिटायझर ने हात स्वच्छ करणे मास्क वापरण्याचा संदेश देत आहेत. सामाजिक अंतर पाळणे , स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन शासनाच्या सुचनाचे पालन करण्याचे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व श्रीराम फाउंडेशन रावेरच्या वतीने करण्यात येत आले. सामाजिक उपक्रमातुन ग्रामीण भागातील गरजुना अभाविप व श्रीराम फाउंडेशन यांच्या मार्फत आरोग्यसेवा देण्यात येत आहे. डॉक्टर आपल्या दारी उपक्रमात रावेर तहसील कार्यालय , पोलिस स्टेशन येथे सैनिटाझर व मास्क वाटप करण्यात आले .फीवर मशीन द्वारे शरीराचे तापमान घेत कोरोना विषयी जनजागृती करण्यात आली.डॉक्टर आपल्या दारी उपक्रमाचे उद्धाटन रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, भा.ज.पा. जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन ,श्रीराम फाउंडेशन सदस्य संतोष महाजन ,वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलकंठ महाजन, डॉ रोशन पाटील, अँड.राहुल मुजुमदार, भास्कर महाजन नगरसेवक यशवंत दलाल, दिलीप पाटील, भूषण चौधरी तसेच गेल्या 6 दिवसांत डॉ.संकेत पाटील, डॉ. माधुरी मॅडम, आरोग्य सेवक चंदू चौधरी, आर.डी.भालेराव व आशा वर्कर्स यांच्या सह ग्रामीण भागात राबविण्यात आला. शहर अध्यक्ष प्रा.युवराज माळी ,अभिजित लोणारी शहर मंत्री राहुल पाटील, अभियान प्रमुख यश सोनार, हेमंत महाजन, मयुर सोनवणे ,जयेश पाटील, योगेश भोई, प्रथमेश दलाल, बापु बारी, नरेंद्र तायडे, प्रेम भोई, वैभव हरदे अनिकेत सोनवणे यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टनसिंगचे पालन करून अभियान सुरू आहे.