चाळीसगाव, (किशोर शेवरे) – सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना कोविड-19 या विषाणूजन्य आजाराचा संपूर्ण जगात उद्रेक झाला असल्याने ग्रामीण भागात उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यासाठी आरोग्य यंत्रणा जीवाचे रान करून सर्व गावात प्रचार आणि मार्गदर्शन करून गावातील ग्रामस्थांना घरी राहण्याचा तसेच नियमित मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत घरोघरी जाऊन ग्रामस्थांमध्ये मोठया प्रमाणात जनजजागृती केली जात आहे.
पर राज्य व पर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना वेगळे राहण्याचा सल्ला दिला जात आहे तसेच त्यांना होम क्वारंटाईन, करून हातांवर शिक्का मारण्यात येत आहे
गावात मुख्य चौकात,दर्शनी भागात बॅनर,पोस्टर लावून कोरोना प्रतिबंधक जनजागृती करण्यात येत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र-तरवाडे,अंतर्गत असलेल्या उपकेंद्र वडाळा वडाळी गावात आणि त्याअंतर्गत असलेल्या न्हावे व ढोमने गावात या प्रकारची सर्व जनजागृती करण्यात येत आहे.
त्यासाठी सरपंच सुनंदाबाई अशोक आमले, व पोलीस पाटील नीलेश अहिरराव यांच्या सहकार्याने उपकेंद्र-वडाळा वडाळी येथील आरोग्य सेवक दिपक लहू ठाकरे, आरोग्य सेविका वैशाली वाघ, आशा सेविका संध्या पाटील.प्रतिभा पाटील,लता पाटील,विजया बोरसे,
तसेच सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस,आदी कर्मचारी आपल्या परिसरात कोरोना विषाणू चा संसर्ग होऊ नये यासाठी परिश्रम घेत आहेत