वरणगाव(प्रतिनिधी):- शहरात सुरू असणाऱ्या लोडशेडिंग मुळे कोरोना काळात लोकांना उकळत्या उन्हामुळे त्रास होत आहे पाणी पुरवठा वितरणावर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे, तसेच रमजान महिन्यात सुद्धा मुस्लीम बांधवाना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.शहरात त्याचप्रमाणे नागरिक कोरोना मुळे त्रस्त झाले असून,त्यात सुरू असणारी लोडशेडिंग त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी निवेदन शाखाअभियंता श्री कुशवा यांना नगराध्यक्ष सुनील काळे,नगरसेवक गणेश चौधरी , हितेश चौधरी , संजय बेदरकर , सचिन मेथळकर, मिलिंद भौसे , संजय सोनार, विक्रांत चांदेलकर, सुनील माळी, संजय जैन, शंकर अण्णा पवार यांनी दिले.