भुसावळ:- येथील समता नगर मधील महिला ही कोरोना रूग्ण आढळून आले त्यावेळेस प्रशासनाने समता नगर सील केले व भुसावळ वासियांना घरातच राहण्यास सांगितले पण काही टवाळ खोरांमुळे सोशल डिस्टन्स फज्जा उडवत आहे.
तर काही अज्ञात लोकांनी कवाडे नगर, आंबेडकर नगर,दुर्गा माता मंदिरच्या मागे, द्वारका नगर आदी ठिकाणी शासनाच्या कोणत्याच परवानगी न घेता रस्तात पत्रे,काटे,दगड, खड्डे करून बंद केले.यामुळे सर्व मार्ग बंद करून टाकले आहे.
रेल्वे कर्मचारी, तसेच रूग्ण जाण्यासाठी जागा सोडली नाही एखाद्या वेळेस गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास अग्नीशमन किंवा रुग्णवाहिका सुद्धा जाणार नाही. यांची प्रशासनाने दखल घेऊन रस्ते मोकळे करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.