मुक्ताईनगर दि. 10 (वार्ताहर) — उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनीषा वाल्मिकी या बहुजन कन्यावर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच केंद्र सरकार घेत असलेल्या खाजगीकरण विरोधात तसेच कृषीविरोधी मंजूर करण्यात आलेल्या कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चा तर्फे मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी बहुजन क्रांती मोर्चा तर्फे नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांना निवेदन देण्यात आले.त्या निवेदनात , उत्तर प्रदेशातील मनिषा वाल्मिकी या बहुजन कन्यावर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन व्हावे तसेच उत्तर प्रदेशासह देशातील विविध भागांमध्ये बहुजन समाजावरील अन्याय अत्याचार करणाऱ्या विरुद्ध कठोर शासन करण्यात यावे , देशामध्ये शासकीय असलेली संस्थाने रेल्वे , विमानसेवा, भारतीय दूरसंचार निगम तसेच संरक्षण विषयक असलेल्या फॅक्टरी यांचे केंद्र सरकार करीत असलेले खाजगीकरण थांबविण्यात यावे , तसेच शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारने घेतलेले कृषी कायदे रद्द करण्यात यावेत , देशामध्ये पीडित बहुजन परिवारास प्रत्येकी एक कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात यावे , त्यांच्या कुटुंबातील एकाच शासकीय नोकरी देण्यात यावी , पीडित परिवारास सुरक्षा देण्यात यावी तसेच अन्याय अत्याचार करणारे बिनदिक्कतपणे राजरोसपणे बाहेर फिरत आहेत, त्यांना अटक करण्यात येऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी आज मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयासमोर बहुजन क्रांती मोर्चा तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाचे नेतृत्व तालुका संयोजक प्रमोद सौंदळे , मीडिया सेल प्रभारी शेख असगर , राष्ट्रीय किसान मोर्चा चे तालुकाध्यक्ष कैलास पाटील राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ तालुका अध्यक्ष संध्याताई हिरोळे , लहुजी क्रांती मोर्चा तालुका अध्यक्ष विशाल खुळे , बहुजन मुक्ती पार्टी तालुकाध्यक्ष ब्रिजलाल इंगळे , भारत मुक्ती मोर्चा तालुका अध्यक्ष राजू भाऊ वानखेडे राजू वानखेडे , बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क तालुकाध्यक्ष सिद्धार्थ हिरोळे , मनोज पोहेकर , सिद्धार्थ वाघ , प्रशांत भोलाणे ,पवन सोनवणे , करण पथरोड , जितेंद्र ढीके , साजन पथरोड , वसंत तेजी , दीपक पारोचे , आकाश शिरावडे , करण धुमाळ , पप्पू कंडारे , कालीचरण तेजी , किशन खंडारे ,अमन ढेंडवाल , लिलाबाई सुरवाडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.














