खिर्डी(प्रतिनिधी) दि.०८/१२/२०२० केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे या प्रमुख मागणी सह शेतकरी हिताच्या इतर मागण्यांसाठी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.माजी खासदार बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी देश भरतील शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर २०२० रोजी भारत बंदची हाक दिली आहे.वंचित बहुजन आघाडी या बंद मध्ये सहभागी होत आहे.केंद्र सरकार उद्योगपतीच्या व व्यापाऱ्यानच्या हिताचे कायदे करीत आहे आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे केंद्र सरकार करीत आहे. तरी केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या विरुद्ध केलेले कायदे तत्काळ रद्द करावे व शेतकऱ्याच्या शेती मालाला किमान हमीभावाने संरक्षण कायद्याद्वारे मिळावे. बाजार भाव पडल्यास कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा माल सरकारने घ्यावा आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून तत्काळ ५०% रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याची तरतूद कायद्यात करावी
केंद्र सरकारने नुकतेच तीन नवीन चुकीचे कृषी विधायक कायदे तत्काळ रद्द करून देश्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा. असे निवेदन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना देण्यात आले अन्यथा शेतकऱ्याच्या बाजूने वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल याच्या होणाऱ्या परिणामास केंद्र सरकार जबाबदार राहील.निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, उपाध्यक्ष सुरेश अटकाळे, सलीम शाह, रफ़िक़ बेग, गौतम अटकाळे, राजेंद्र अवसरमल, प्रतिक दामोदरे, नितीन तायडे दिलीप पानपाटील, संतोष नाईके, रवी मेढे, रमेश सोनावणे, श्रावण पाटील, कैलास धनगर, नरेंद्र गाढे यांच्या स्वाक्षऱ्या आहे.















