जळगाव, (प्रतिनिधी)- जळगाव आगारातील वाहक मनोज चौधरी यांनी महामंडळातील कार्यपद्धतीस व ठाकरे सरकार ला जबाबदार धरत आज दि. ९ रोजी आत्महत्या केली. या वाहकाच्या आत्महत्या बाबत राज्यपालांनी ‘स्वाधिकार’ ने दखल घेऊन संबंधितांवर खुनाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून केली आहे.
आ. मंगेश चव्हाण यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर आत्महत्या करणाऱ्या वाहकाने मृत्यूपूर्वी लिहलेली चिट्ठी शेअर केली असून त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे की ”ह्या आत्महत्येच्या चिठ्ठीची राज्यपाल महोदयांनी SuMoto दखल घेऊन…संबंधितावर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणी सर्वांची रवानगी तळोजा कारागृहात करावी…”