वरणगाव,(अंकुश गायकवाड):-कोरानाच्या विषाणूची दस्तक शहराच्या दोन्ही बाजुला येवून ठेपली आहे. याला एकच उपाय म्हणजे सर्वांनी घरात बसणे व सोशल डिस्टन्स पाळणे हेच ओळखून वरणगाव शहरातील पालिका, पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधींनी स्वयंस्फूर्तीने दोन दिवसाच्या लॉक डाऊनचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मंगळवारचा आठवडा बाजार असल्याने हा निर्णय योग्य वेळी घेतला असून शहरातील नागरीकांनी पहिल्याच दिवशी शंभर टक्के सहभागी होवून एकजुटीने कोरोनाच्या लढाईत उतरले आहे.
शहरात मंगळवारला आठवडे बाजार असतो. या ठिकाणी शहरासह सत्तावीस खेड्यातील नागरीक बाजारा निमित्त येत असतात. तर व्यावसायीक देखील तालुका भरातून येत असतात. वारंवार सुचना देवून देखील सोशल डीस्टन्स पाळले जात नाही. त्यात वरणगाव शहराच्या एका बाजुला भुसावळ व दुसऱ्या बाजुला मुक्ताईनगरात कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले. यामुळे मंगळवारच्या आठवडे बाजारामुळे परिस्थीती बीघडू नये यासाठी सर्वांनी एकमताने दोन दिवस 48 तासाचा जनता कर्फ्यु पाळण्याचे ठरले. यासाठी प्रशासनाने कंबर कसली. या लढाईत व्यापारी संघटना, भाजीपाला विक्रेते, इतर जीवनावश्यक वस्तूचे दुकानदार यांचा सहभाग महत्वपूर्ण ठरला असुन याला साथ शहरातील नागरीकांनी दिली आहे. महत्वपूर्ण निर्णयाने वरणगावकर यांनी एकजुटीचे दर्शन सकाळपासून दाखवले असून अशीच एकजूट उद्या रात्री पर्यंत गरजेची आहे लढाईत यशस्वी होणार असल्याचा विश्वास वरणगावकरांनी दाखविला असुन विषाणूच्या संसर्गाला आळा घालणार आहेत.

















