नवी दिल्ली – काँग्रेसच्या अध्यक्ष्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि पार्टीचे इतर नेता दिल्लीच्या हिंसाचारावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान त्या म्हणाल्या की, दिल्लीमध्ये दंगली होत राहिल्या आणि केंद्र सरकार केवळ बघत राहिले. आम्ही राष्ट्रपतींना देशातील लोकांचे आयुष्य, स्वातंत्र्य आणि संपत्तीची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निवेदन दिले आहे. आम्ही गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, भाजपा जे बोलते, त्यांना बोलू द्या, आम्हीही बोलणार.
देशात लोकशाही संपली आहे का : ममता…
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी बुधवारी आपल्या एका कवितेमध्ये दिल्ली हिंसाचाराची निंदा केली. त्यांनी लिहिले, ‘‘एका वादळाने देशाला बंदुकीच्या टोकावर उभे केले, एक शांत देश हिंसक झाला, देशातून लोकशाही संपली आहे का. याचे उत्तर कोण देईल. अखेर या समस्येचे निराकरण कुणाकडे असेल, आपण मूकबधिर झालो आहोत. एक पवित्र भूमी नरकात बदलली आहे.’’
बुधवारीदेखील काँग्रेसने शांतता मार्च काढला होता…
दिल्ली हिंसाचाराबद्दल बुधवारीदेखील काँग्रेसने शांतता मार्च काढला होता. काँग्रेस कार्यकर्ता गांधी सृतिकडे जात होते. पण पोलिसांनी त्यांना जनपथ रोडवरच रोखले. यानंतर प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेता आणि कार्यकर्ता तिथेच आंदोलनासाठी बसले. प्रियांका यांनी आरोप केला की, केंद्र सरकार दिल्लीमध्ये रोखण्यास असमर्थ ठरले आणि या अपयशासाठी गृहमंत्री अमित शाह यांनि राजीनामा दिला पाहिजे.
बुधवारीच प्रेस कॉन्फरन्समध्ये सोनिया म्हणाल्या होत्या. ‘‘मागील काही दिवसांपासून होत असलेला हिंसाचार ठरवल्याप्रमाणे होत आहे. दिल्ली निवडणुकीच्या वेळेलाही असेच झाले होते. भाजपाच्या नेत्यांनी भडकाऊ वक्तव्ये करून हिंसाचार भडकवले आहे. एका भाजपा नेत्याने मागील रविवारीदेखील पोलिसांना तीन दिवसांचे अल्टीमेटम देत भडकाऊ भाषण दिले होते. गृहमंत्री शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे.’’















