पारोळा – अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या दोन सदस्यीय केंद्रीय पथकाचे तालुक्यात सायंकाळी साडेसहाला अंधारातच आगमन झाले. गाडीतून उतरत तीन मिनिटात विचारपूस करून त्यांनी दौरा संपवला त्यामुळे हे पथक पहाणीसाठी आले की बळीराजाच्या जखमेवर मिठ चोळण्यासाठी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
शेतात प्रत्यक्ष पाहणी न करता रस्त्यावरच शेतकर्यांची विचारपूस करुन अहवाल कसा देणार याबाबत शेतकर्यांमध्ये आता चिंता पसरली आहे.तालुक्यात आक्टोबर महिण्यात झालेल्या अतिवृष्टिमुळे 114 गावामधील 52729.66 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. दुपारी केंद्रीय पथक मोंढाळे प्र अ, करंजी बु व सावरखेड मराठ येथील शेतकर्यांच्या पिकाची पाहणी करणार होते.परंतु दुपारी येणार्या पथकाने सायंकाळी सुमारे 6.35 ला दाखल होत.रस्त्यावरच पाहणी केल्यान नाराजी व्यक्त होत आहे.
या पथकात केंद्रीय अर्थमंत्रालयातील खर्च विभागाचे सल्लागार दिनानाथ व जयपुर येथील कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डाँ सुभाष चंद्रा,नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने,कृषी उपसंचालक अनिल भोकरे,जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकुर,उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर,प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसिलदार अनिल गवांदे,प्रभारी कृषी अधिकारी सुरेश खेताडे व कृषीसहाय्यक व मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते.
नुकसानीची पाहणी सायंकाळच्या सुमारास व प्रत्यक्ष शेतात न जाता रस्त्यावरच तीन मिनिटे केल्याने नुकसानीचा अहवाल शेतकरी हिताचा राहील का हा प्रश्न अनुत्तरीत आहे.यावेळी मोंढाळे प्र अ.येथील शेतकरी भाऊलाल विठ्ठल पाटील यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केंद्रीय समिती करणार होती. मात्र त्यांचा देखील हिरमोड झाला. यावेळी मोंढाळे प्र अ सरपंच महारु पाटोळे , नंदलाल पाटील, सुधाकर पाटील, बळीराम पाटील, सतीश पाटील, किशोर पाटील, नंदू पाटील, विठ्ठल पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान करंजी येथील नुकसानग्रस्त शेतकरी रविंद्र रामचंद्र पाटील,गोरख माळी व सावरखेड मराठ येथील शेतकरी राधेश्याम तोताराम नारायणी यांच्या पदरी निराशा पसरली.















