एकदा का जीवनामध्ये निर्लेप्त राहायला शिकलो की मग मानसिक आणि शारीरिक आजार आपल्या शरीरात प्रवेशही करू शकत नाही.आरोग्य म्हणजे काय तर आयुर्वेदाने सांगितले आहे वात पित्त आणि कफ यांचा समतोल साधणे म्हणजेच आरोग्य होय पतंजली योग घेरण्ड संहिता यात आपण बघितले योगी साठी त्यांनी काही नियम बनवलेले आहेत.
योगा करताना योगी ने काही नियम पाळायचे असतात व शरीराचे शुद्धीकरण करायचे असते हे यातून आपण अभ्यासले.
हटयोग प्रदीपिका मध्ये पाच उपदेश दिले आहेत.
1) प्रथम उपदेश:– प्रथम उपदेश मध्ये योगा करण्यासाठीची वेळ, स्थळ, आसन, आहार-विहार, मन स्थैर्य याबद्दल मार्गदर्शन केले आहे. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळेस योगा करणे योग्य नाही योगा करण्यासाठी ज्या स्थानाची तुम्ही निवड कराल तिथे आवाज नसावा. उन्हात करू नये. आजूबाजूला स्वच्छ हवा असावी. वेळ साधारण शांततेची निवडावी म्हणजे पहाटेची. ज्यावेळेस वातावरणामध्ये प्राणवायूचे प्रमाण जास्त असते. प्रदूषण कमी असते आणि गोंगाटही कमी असतो. बसन्याचे आसन अती खडक किंवा अतीनरम नसावे.
2) व्दितीय उपदेश:—यात प्राणायाम कसे करावे याची विस्तृत माहिती दिलेली आहे.
प्राण आणि मन त्याबद्दल सांगितले आहे स्वामी स्वतमारम यांनी सांगितले आहे की सिद्धासन पद्मासन किंवा वज्रासनात प्राणायाम केल्यास जास्त प्रभावी असते.
3) तृतीय उपदेश:- यात 126 भाग दिले आहेत योगाचे वैशिष्ट्य म्हणजे यात मुद्रा दिलेले आहेत दहा प्रकारच्या मुद्रा यात दिल्या आहेत जसे महामुद्रा, महा बंद ,महावेध, खेकरी, उड्डीयान, मूल बंद, जालंदर बंध, विपरीता करणी, वज्रोली, शक्तीकलीनी. ह्या मुद्रा म्हणजे आपल्या बोटांवर चे प्रेशर पॉईंट असतात. मेंदूच्या पेशी जागृत करण्यासाठी किंवा शरीराच्या इतर संस्थांच्या पेशींना उत्तेजना देण्यासाठी हे प्रेशर पॉइंट, ह्या मुद्रा उपयोगाच्या असतात. बंध प्राणायाम मध्ये बंद क्रियांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या बंधनांमुळे आत राहिलेला वायू जो आहे तो तिथल्या ग्रंथींना मसाज करत असतो आणि त्यामुळे त्यांची कार्य सुधारते. बंदमुळे प्राणवायू जास्त वेळ शरीरात ठेवला जातो त्यामुळे जास्तीत जास्त प्राणवायू हा पेशींच्या मार्फत शोषला जातो. मुद्रा आणि बंदच्या नियमित सरावाने कुंडलिनी जागृत होते असे म्हणतात. एक मात्र निश्चित जास्त प्राणवायू मिळणे आणि शरीराच्या आतून स्वेदन होणे त्यामुळे तारुण्य टिकून राहते अर्थातच नित्य सरावाने.
4) चतुर्थ उपदेश:–या उपदेशात समाधीचे स्वरूप वर्णीलेले आहे. योगाची शेवटची पायरी म्हणजे समाधी हे आपण बघितलं यात मन व शरीर स्थिर होते त्याच परिस्थितीत राहते ह्या सर्व क्रियांनी सुषुम्ना नाडी जागृत होते योगाचे ह्या पायरीला राज योग म्हणतात समाधी उन्मनी प्राण आणि मन एक होणे. समाधी सहज मुक्ती.
5) पंचम उपदेश:– आजारांचे मूळ काय असते याबद्दल या उद्देशात सांगितले आहे. सर्वप्रथम वात दोष पित्त दोष आणि कफ दोष या त्रिदोषात असंतुलन तयार झाले की आजार होतात. पायापासून कमरेपर्यंत वातदोष कमरेपासून छातीपर्यंत पित्तदोष आणि छातीपासून डोक्यापर्यंत कफदोषाचे अधिपत्य असते.
या त्रिदोषांचे संतुलन आहार-विहार योगा आसने यामधून केले जाते.
आचरण. रात्रीतून भिजवून ठेवलेला त्रिफळा चुर्णाचे पाणी सकाळी दोन वेळा स्वच्छ वश्त्रगाळ करून त्या पाण्याने डोळे धुवायचे.
विश्लेषण:– दिवसभर कम्प्युटर स्क्रीन वर मोबाईलवर किंवा वाचन करून डोळ्यांच्या नसांमध्ये ताण निर्माण होतो. वयानुसार हळूहळू डोळ्यांचे स्नायू शिथिल होत जातात. त्यामुळे दृष्टी कमजोर होते. डोळ्यांना थकवा येतो. त्रिफळा चूर्णामध्ये ह्या शिथील झालेल्या स्नायूंना ताठरता आणण्याची ताकद असते. तसेच नसांमध्ये निर्माण झालेला ताणही ते कमी करते आणि डोळ्यांना आराम मिळतो. नियमित त्रिफळाच्या पाण्याने डोळे धुतल्यास चष्म्याचा नंबरही वाढत नाही आणि दृष्टी सुधारते.
क्रमशः















