अमळनेर -भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार यांनी गेल्या काही दिवसांपासून ग्रामिण भागात प्रचार दौरा सुरू केलेला असून त्यांना सर्वच स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघात मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांमुळे भूमिपुत्र या मुद्याला सर्वत्र विरोध होत आहे. .
दररोज किमान 10 ते 12 गावांच्या भेटी या दौर्याच्या माध्यमातून होत असून अनेक गावांत महिला भगिनी आ. शिरीष चौधरी यांचे औक्षण करून शुभसंकेत देत आहेत. या नियोजनबद्ध कार्यक्रमातून आज दि. 6 रोजी अमळनेर तालुक्यातील कुर्हे बु,कुर्हे खु, टाकरखेडा, औरंगपूर, म्हसले, कंडारी,लोणे,मंगरूळ, पिंपळे खु, पिंपळे बु (चिमणपुरी)आदी गावातील नागरिकांच्या भेटी घेतल्या. .
आ. शिरीष चौधरी यांनी कायम जनसंपर्क ठेवला असून निवडणूक पूर्वीदेखील अमळनेर मतदारसंघात सर्व समाजबांधवांशी संपर्क ठेवला होता. विकास कामांमुळे आज त्यांना मिळत असलेला पाठिंबा म्हणजे जनतेच्या केलेल्या कामाची पावती आहे. विकास काम करणार्याला भूमिपुत्र असल्याची गरज नसून मतदारांच्या गरजा समजणार्याला व सोडविणार्याला जनता प्रतिसाद देत असल्यामुळे सर्वत्र भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे. .
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, नगरसेवक संजय कौतिक पाटील, दादा पवार, गोरख पाटील, माजी पं.स. उपसभापती उदय पाटील, किरण गोसावी, माजी महिला आघाडी तालुकाप्रमुख भाजपा सुरेखा पवार, जाकीर शेख, उपसरपंच आर्डी किशोर पाटील, समाधान धनगर, मच्छद्रिं पाटील, रोशन सोनवणे, सुनील राजपूत, प्रवीण राजपूत, सरपंच पती मंगरूळ प्रा.संदीप पाटील, सरपंच दिनेश पाटील, पुरूषोत्तम चौधरी, भरत पाटील आदी दौर्यांमध्ये सहभागी होते.














