औरंगाबाद : आज म्हणजेच २१ फेब्रुवारी पासून बोर्डाच्या बारावी परीक्षेला सुरुवात होत आहे. मात्र, परीक्षेच्या काही तासाआधीच एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. परीक्षेच्या तणावातून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद घडली आहे. आमन रविंद आहेरेवाल असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. . या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
औरंगाबादच्या (Aurngabad) एन.८ सिडको भागातील गुरुनगर हौसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. सोमवारी २० फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. विद्यार्थ्याने परीक्षेच्या तणावातून जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांसह नातेवाईकांनी वर्तवला आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे पण वाचा.
SBIच्या करोडो ग्राहकांना झटका! 17 मार्चपासून बँकेत होणार हा बदल, जास्त पैसे खर्च करावे लागतील
तापमानात अचानक वाढ, या राज्यांमध्ये पावसाचा इशारा; जाणून घ्या तुमच्या राज्यातील स्थिती
ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का ; शिंदे गटाने विधिमंडळातील पक्ष कार्यालयावर केला कब्जा














