मुंबई – महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. कोणत्या पक्षाकडे किती मंत्रिपदं जातील यावर यापूर्वीच एकमत झाले आहे. मात्र कोणत्या आमदाराला कोणतं मंत्रिपद मिळेल याबाबत उत्सुकता आहे. ज्या गृहमंत्रिपदावरून तू तू मै मै सुरु आहे ते राष्ट्रवादीकडे जाऊन अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह गृहमंत्रीपदाची जबाबदारी येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, आमची यादी अंतिम टप्प्यावर आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.
यासोबतच धनंजय मुंडे यांच्याकडे अर्थ, जयंत पाटील यांच्याकडे पाटबंधारे, छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास आणि जितेंद्र आव्हाडांकडे सामाजिक न्याय मंत्रिपदाची धुरा जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
कोणात्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदं?
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या जागांनुसार साधारणपणे मंत्रिपदाचं वाटप झाल्याचं समजतं. त्यानुसार, शिवसेनेचे १३, राष्ट्रवादीचे १३ आणि काँग्रेसचे १० आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.