नाशिक । राज्यात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून अशातच आज सकाळी मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघात ६ जण ठार झाले आहे. तर ६ जण जखमी झाले. धक्कादायक या अपघातातील मृतांमध्ये यावल तालुक्यातील न्हावी येथील प्रज्वल शंकर फिरके या युवकाचा समावेश आहे.
आज १८ जुलैच्या सकाळी ६:३० च्या सुमारास मौजे पडघा खडवली फाट्याजवळ कंटेनर MH 48 T 7532 व काळी पिवळी जीप MH04E 1771 (विद्यार्थी असलेली) पडघा वरुन खडावली रेल्वे स्टेशनला जात असताना भीषण अपघात झाला. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला.
हे सुद्धा वाचा…
एरंडोल येथील मशिदीचं प्रकरण पोहोचलं न्यायालयात ; नेमकं प्रकरण काय?
सहाराच्या गुंतवणूकदारांना अमित शहांचा ‘सहारा’, अडकलेले पूर्ण पैसे मिळणार परत!
.. हे बोगस खते आणि बियाणे गुजरातमधून येत आहे ; गिरीश महाजन
दरम्यान, या अपघातातील मृतांमध्ये यावल तालुक्यातील न्हावी येथील तरुणाचा समावेश आहे. प्रज्वल फिरके हा सध्या मुंबई येथे वास्तव्यास होता. आज सकाळी त्याच्या मृत्यूची माहिती येताच परिसरावर शोककळा पसरली आहे.
अपघाती मृत्यू झालेल्यांची नावं
१) चिन्मयी विकास शिंदे (वय १५)
२) रिया किशोर परदेशी
३) चैताली सुशांत पिंपळे (वय २७)
४)संतोष अनंत जाधव (वय ५०)
५)वसंत धर्मा जाधव (वय ५०)
६) प्रज्वल शंकर फिरके

