ऐकावं ते नवलचं…. असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही कारण फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. हृषिकेश पै यांनी एक मोठा दावा केला आहे की, दोन महिलाही एकत्र येऊन मूल जन्माला घालू शकतील… आता हे ऐकल्यावर अनेकांना प्रश्न पडला असेल की हे कसं काय शक्य आहे, पण डॉ. हृषीकेश पै यांनी याबाबत दावा केला यामुळे आता विज्ञान इतकं पुढे गेलं यावर विश्वासचं बसत नाही.
Dr. Hrishikesh Pai
काय म्हणाले डॉ. हृषिकेश पै….
‘असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह ‘टेक्नॉलॉजी’ (एआरटी) तंत्रज्ञान इतक्या वेगाने विकसित होत आहे की, भविष्यात दोन महिला एकत्र येऊन मूल जन्माला घालू शकतील. पुरुषाची गरज पडणार नाही असा दावा ‘फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. हृषिकेश पै यांनी रविवारी नागपूर येथे ‘नॅशनल ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी’चा (एनओजीएस) पदग्रहण सोहळा व त्यानंतर आयोजित परिषदेत ‘लोकमत’शी बोलतांना केला आहे याबाबतचे वृत्त देखील लोकमत ने प्रकाशित केल आहे.
पुढील १० वर्षांत गर्भाची गरजच नाही
डॉ. हृषीकेश पै यांनी पुढे बोलतांना सांगितलं की पुढील १० वर्षात मुले जन्माला घालण्यासाठी गर्भाची गरज भासणार नाही. प्रयोगशाळेत वाढलेली बाळे हे वास्तव असेल. एका शतकाहून अधिक काळापासून शास्त्रज्ञ यावर काम करत आहेत. मात्र, हे तंत्रज्ञान भारतासारख्या देशात पोहोचण्यास अनेक वर्षे लागू शकतात.डॉ. पै यांनी सांगितले, महिलांना भविष्यात मूल होऊ शकते. कारण एका जोडीदाराच्या त्वचेच्या पेशी शुक्राणूंच्या पेशींमध्ये बदलल्या जाऊ शकतात. ज्याचा उपयोग दुसऱ्या जोडीदाराच्या अंडींना फलित करण्यासाठी केला जाऊ शकतो.

हे सुद्धा वाचा….
महिलांसाठी ही विशेष योजना 1 एप्रिल पासून झाली सुरु : नेमकी काय आणि कसा लाभ मिळेल?
खळबळजनक! तरुणीने बनवला आपल्याच मैत्रिणीचा बाथरूममधील आंघोळ करतानाचा व्हिडीओ, अन्…