जळगाव, (प्रतिनिधी): राज्यातील कर्मचारी संपावर गेल्यामुळे १० वी १२ विची परीक्षा होईल की नाही, परीक्षा तारीख पुढे लोटली जाते याबाबत विध्यार्थी चिंतेत होते मात्र महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) यांच्यासह इतर संघटनांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी व बारावीचा बुधवारचा पेपर होणार आहे.
एकच मिशन… जुनी पेन्शन…
एकच मिशन… जुनी पेन्शन…घोषणा देत राज्य कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे मंगळवारचा बारावीचा पेपर होईल की नाही या तणावात विद्यार्थी व शिक्षण विभाग होता. त्यांना जिल्ह्यात दोन ठिकाणी पूरक व्यवस्था करावी लागली.
दहावीला विद्यार्थी व संपातील परीक्षा केंद्रांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणार असलेला दहावीचा गणित २ (भूमिती) आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ दरम्यानचा बारावीचा मानसशास्त्र विषयाचा पेपर एकाच दिवशी सुरळीतपणे पार पाडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. या दरम्यान दुपारी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) यांनी सर्वांनाच दिलासा देणारा निर्णय घेतला. त्यानुसार शिक्षक दहावीच्या परीक्षेसाठी हजर होणार आहेत.
सायंकाळी शिक्षण विभागाने केंद्र संचालकांची बैठक घेऊन परीक्षेचे नियोजन केले. गरज भासल्यास विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील कर्मचारी राखीव म्हणून शोधून ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सर्व शिक्षा अभियानचे कर्मचारी, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांतील शिक्षकांची मदत घेतली जाईल अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.