मुंबई : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत घरोबा केला खरा पण आता सहा महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी तरीही दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे अनेक आमदार मंत्रिपदासाठी वेटिंगवर आहेत. त्यात प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे देखील नाराज असल्याचे अनेकवेळा दिसून आले. मंत्रिपद मिळालं नसलं तरी आता बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
अमरावतीत एका कार्यक्रमात बच्चू कडू यांनी आपल्या मनातली इच्छा व्यक्त करत आम्हाला देखील मुख्यमंत्री व्हायचं आहे, असं म्हटलय. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी म्हटलं की, ‘प्रहार आपला स्वतःचा पक्ष आहे आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे. लोक आम्हाला म्हणतात, गद्दारी का केली. आम्ही काही गद्दारी केली नाही, आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत केलं.
हे पण वाचा..
‘बिग बी’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी ; महानायक अमिताभ बच्चन यांचा अपघात
‘काय होतास तू.. काय झालास तू?’.. गिरीश महाजनांची बोचरी टीका कुणावर?
अति वीज बिलाने हैराण झाला आहात? मग या उपकरणांचा वापर बंद करा, वीज बिल निम्म्याहून कमी येईल
यापूर्वी सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्रिपदावरील आपली आकांक्षा व्यक्त केली. त्यामुळे राजकीय चर्चा रंगली आहे.