मुंबई : आजच्या मंत्रीमंडळ बैठकीतील एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पीएम श्री योजनेची घोषणा केली होती. यामध्ये शाळा अद्यावयत करण्यासाठी ही घोषणा करण्यात आली होती आता राज्यातही ही योजना राबवली जाणार आहे. पीएमश्री योजना महाराष्ट्रात लागू करण्यात येणार असून शाळांचे सक्षमीकरण केले जाणार असून पहिल्या टप्प्यात 816 शाळा विकसित करण्यात येणार आहे.
काय आहे पीएम श्री योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पीएम श्री योजनेची घोषणा केली होती. यामध्ये शाळा अद्यावयत करण्यासाठी ही घोषणा करण्यात आली होती. या अंतर्गत देशात 14 हजार 597 शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातही ही योजना राबवली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
पीएम श्री योजनेच्या माध्यमातून शाळांना सक्षम केलं जाणार आहे. प्रयोगात्मक अध्ययन हा त्यातील महत्वाचा भाग असणार आहे. खेळाच्या माध्यमातून अभ्यास, संशोधन करून त्याचा अभ्यास, चर्चात्मक अभ्यास करण्यावरही भर दिला जाणार आहे.
हे पण वाचा..
सोने 65,000, तर चांदी 80,000 रुपयाचा टप्पा गाठणार? काय आहे आजचे नवे दर
जगासमोर नवं संकट ! कोरोनापेक्षाही धोकादायक व्हायरसची एन्ट्री, जागतिक आरोग्य संघटनेने बोलावली बैठक
वर्गातच प्रोपज करायला गेला, पुढे मुलीने काय केलं पहा व्हिडीओ
Jalgaon : व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड लांबविली ; चोरटे CCTV मध्ये कैद
याशिवाय प्रत्येक स्तरावर चाचणी कारणे आणि त्यानुसार ज्ञानात भर वाढविण्यासाठी विद्यार्थ्याची क्षमता वाढविण्यासाठी मार्गदर्शन करून घेणे. या बाबींचा महत्वाचा भाग या योजनेत असणार आहे.
प्रधानमंत्री स्कूल फॉर रायजिंग इंडिया महाराष्ट्रात राबवण्यासंदर्भात मंत्री मंडळ बैठकीत चर्चा झाली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्र्यांमध्ये खलबते सुरू होती.