मुंबई : केंद्रासह राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासासाठी अनेक योजना राबविल्या जात आहे. अशातच राज्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 हजारांपर्यंतचे अनुदान देण्याची घोषणा केलीय. त्यासाठीही सरकारने काही अति आणि शर्ती लागू केल्या आहेत. चला तर जाणून घेऊया तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की अपात्र आहात जाणून घेऊया…
कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल.शासन निर्णय क्रमांकः प्रोअयो ०६२२/प्र.क्र.७२/२स या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.
50 हजार प्रोत्साहन पात्र शेतकरी कोण
सन २०१९ वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा सदर योजनेस पात्र असणार आहेत. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घेऊ शकतात.
हे पण वाचा :
मामाच्या मुलीवर जडलं प्रेम, लग्नाला मामाचा नकार, नंतर रागाच्या भरात भाच्याने जे केलं ते धक्कादायक…
मुलांच्या नावावर FD करण्याचा विचार करताय? जाणून घ्या व्याजाच्या उत्पन्नावर कसा कर लागेल?
अजित पवारांनीही सकाळी शपथ घेतली होती, मग… गुलाबराव पाटलांचा टोला
सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत :-
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत कर्जमाफीचा Crop Insurance लाभ मिळालेले शेतकरी या योजनेसाठी अपात्र आहेत. महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा/राज्यसभा सदस्य,आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य हेदखील या योजनेसाठी अपात्र असणार आहेत.