चाळीसगाव,(प्रतिनिधी)- आज गणेश विसर्जनाच्या दिवशी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या बापलेकावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली, बाप आणि मुलगा शेतात काम करत असतांना वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला या घटनेनं परिसरात हळ हळ व्यक्त होतं आहे.
चाळीसगाव तालुक्यातील न्हावे येथे शुक्रवारी दुपारी २ वाजता शेतात काम करणाऱ्या आबा शिवाजी चव्हाण ( ४५) आणि दीपक आबा चव्हाण यांचा वीज कोसळून मृत्यू झाला तर शेतात काम करणाऱ्या महिला यावेळी बचावल्या आहेत.
खत देण्यासाठी शेतात गेले होते….
आज शुक्रवारी दुपारी २ वाजता अचानक विजांचा कडकडाट सुरु होऊन पावसालाही सुरुवात झाली. आबा चव्हाण आणि त्यांचा मुलगा दीपक व पत्नी इतर महिलांसोबत सकाळीच शेतात कपाशीला खत देण्यासाठी गेले होते. दुपारी पावसाला सुरुवात झाल्याने ते शेवग्याच्या झाडाखाली थांबले. याचवेळी त्यांच्यावर वीज कोसळली. यात बापलेकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
WhatsApp us