मुंबई : ऑगस्ट महिना संपायला अवघे ३ दिवस राहिले आहे. अशा स्थितीत हा महिना संपण्यापूर्वी काही महत्त्वाची आर्थिक कामे आहेत जी 31 ऑगस्टपर्यंत करणे अत्यंत आवश्यक आहे. असे न केल्यास तुम्हाला नंतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ती नेमकी कोणती आहेत ते जाणून घेऊयात…
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केले पाहिजे
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल आणि तुम्ही अद्याप त्याचे KYC केले नसेल, तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. सरकारने योजनेसाठी केवायसीची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2022 ठेवली आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही. सरकारने यापूर्वी केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 ठेवली होती, जी आता 31 ऑगस्ट 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या दिवसापूर्वी लोकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे त्यांना 11 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार सप्टेंबर महिन्यात योजनेचा 12 वा हप्ता जाहीर करू शकते.
PNB ग्राहकांनी 31 ऑगस्टपूर्वी KYC करून घ्या
तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर 31 ऑगस्टपूर्वी तुमच्या खात्याचे KYC करा. अन्यथा बँक तुमचे खाते होल्डवर ठेवेल. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबद्दल माहिती देताना बँकेने म्हटले आहे की ज्या ग्राहकांनी 31 मार्च 2022 पर्यंत त्यांच्या खात्याची KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांनी हे काम 31 ऑगस्ट 2022 पर्यंत करावे अन्यथा तुमचे खाते नंतर रोखले जाईल.
ITR पडताळणी पूर्ण करा
जर तुम्ही 31 जुलै 2022 नंतर आयकर रिटर्न भरले असेल, तर तुम्ही त्याचे पडताळणीचे काम 1 महिन्याच्या आत म्हणजे 30 दिवसांत पूर्ण केले पाहिजे. आयकर विभागाने ही माहिती दिली आहे की, ज्यांनी 31 जुलैच्या अंतिम मुदतीनंतर आयटीआर भरला आहे, त्यांना त्याच्या पडताळणीसाठी फक्त 30 दिवसांचा अवधी मिळेल. जर तुम्ही तुमचे रिटर्न 1 ऑगस्टला भरले असेल, तर तुमच्या पडताळणीची अंतिम मुदत 31 ऑगस्ट रोजी संपत आहे. पडताळणीशिवाय, तुमचे आयटीआर रिटर्न पूर्ण मानले जाणार नाही.