औरंगाबाद : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीचे अधिकारी आज सकाळीच राऊतांच्या घरी पोहोचले आहे. यावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांची चौकशी चालू आहे ना. चालू द्या. त्यांना अटक होणार की नाही मला माहीत नाही. मी काही अधिकारी नाही. ईडीची (ED) चौकशी सुरू आहे. चौकशी होऊ द्या. राऊतांनीच सांगितलंय, मी काही केलं नाही. मग कर नाही त्याला डर कशाला? चौकशी होऊ द्या. त्यातून सत्य पुढे येईलच, असं सांगतानाच ते महाविकास आघाडीचे मोठे नेते होते. रोज सकाळी 9 वाजता ते बोलत होते, असा चिमटाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
तसेच ईडीच्या भीतीने, दबावाने कुणीही आमच्याकडे येऊ नये. आमच्या शिवसेनेत येऊ नये आणि भाजपमध्येही कुणी जाऊ नये, असं मी जाहीरपणे आवाहन करत आहोत, असं सांगतानाच आम्ही कधीच कुणाला दबाव किंवा दहशतीने आमच्याकडे आणलं नाही, असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
हे पण वाचा :
सुसाईड नोट लिहून अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमासृष्टी हादरली
अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, पण तो.. रामदास कदमांची घणाघात
सोने खरेदीदारांना झटका, सलग दुसऱ्या आठवड्यात वाढले इतके भाव?
संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढणार ; चौकशीसाठी ईडीचं पथक पोहोचलं घरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मराठवाड्यातील पूरपरिस्थिती, शेतीचं नुकसान, नागरिकांच्या गुरं ढोरं आणि घरांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना विविध योजनांची माहिती दिली. तसेच काही महत्त्वाच्या घोषणाही केल्या.