मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संजय राऊत यांनी घेतलेल्या सामनामधील मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रसारित झाला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदारांवर जोरदार प्रहार केला आहे.
‘प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. भाजपवाल्यांनो, सावधान… उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री झालो तर प्रॉब्लेम काय तुम्हाला? म्हणून काय तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको. ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता. मी तेव्हा म्हणालो होतो, संयम ठेवा. आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक होते. गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता, असं ठाकरे म्हणाले.
हे पण वाचा…
SBI Alert : आता ATM मधून पैसे काढण्याचा नियम बदलला, आजच जाणून घ्या
राजकीय भूकंप होणार ; भाजपचे १६ आमदार फुटणार? बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
महाराष्ट्रातील या विभागात भरती, जाणून घ्या पात्रता?
दरम्यान, या मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यावरही भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले कि, गडकरी म्हणाले होते आमच्याकडे वॉशिंग मशिन आहे. लोकांना आमच्या पक्षात घेऊन आम्ही पुण्यवान करतो. आरोप असणारे त्यांच्या पक्षात गेल्यावर त्यांचं पुढे काय होणार आहे? शिवसेनेच्या ज्या नेत्यांना २४ तासात तुरुंगात जातील असे आरोप होत होते ते भाजपात गेल्यावर स्वच्छ झाले. नवनव्या लोकांना त्रास दिला जातोय. हे सशक्त राज्यकर्त्याचं लक्षण नाही, असं ते म्हणाले.