मुंबई : जुलै महिन्याच्या सुरवातीपासूनच राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं तर काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, अशातच आता येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार असून, शनिवारसह रविवारी पावसाचा प्रभाव थोडा अधिक राहील, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. कोकणात पावसाचा जोर थोडा अधिक राहील, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली असली, तरी मुंबईकडे मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. मुंबईवर दाटून येणारे ढग गर्दी करत असले, तरी प्रत्यक्षात पाऊस हुलकावणी देत आहे.
२३ आणि २४ जुलै : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल; शिवाय मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हे पण वाचा :
मोठी बातमी ! गिरीष महाजनांविरोधातील गुन्ह्यांचा तपास CBI कडे
अबब.. मंत्र्यांच्या घरात कोट्यवधींच्या कॅशचा ढीग पाहून अधिकारी झाले हैराण
जळगावच्या महापौरांनी केला शिंदे गटावर खळबळजनक आरोप
PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ; बँकेने दिली ही गुडनूज
या जिल्ह्यांना इशारा
२३ जुलै : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.
२४ जुलै : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, नंदुरबार, जळगाव.