मुंबई,(प्रतिनिधी)- राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने मोठं नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे १ जून २०२२ पासून आतापर्यंतच्या साधारण चाळीस दिवसात पावसाशी संबंधित घटनांमुळे राज्यभरात एकूण ७६ जणांना मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ७६ पैकी ९ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली असल्याचं ANI वृत्तसंस्थेने ट्विट करून दिली आहे.
Maharashtra | A total of 76 deaths have been reported due to rain-related incidents in state since June 1. As many as 839 houses have been damaged, while over 4,916 people have been shifted to safety, as heavy rains continue to lash the state: State Disaster Management Department
— ANI (@ANI) July 10, 2022
दरम्यान राज्यभरात झालेल्या पावसामुळे तब्बल ८३८ घरांचे नुकसान झाले आहे आणि ४९१६ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आपत्ती एमजीएमटी विभाग आणि पुनर्वसन विभागाने ३५ मदत शिबिरे स्थापन केली असल्याने पीडितांना मदत पोहचविण्यात मदत होतं आहे.दरम्यान याचं कालावधी मध्ये सव्वाशे प्राण्यांना देखील आपला जीव गमवावा लागला आहे अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
गेल्या आठवड्या भरापासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सुरुवातीला भारतीय हवामान खात्याच्या अंदाजनुसार पाऊस झाला नाही. परंतु आता राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये पावसाने कहर केला आहे.आता पुन्हा एकदा हवामान खात्यानं मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.