बोदवड, (सचिन पाटील)- बोदवड तालुक्यात रासायनिक खतांचा अनियमित पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना त्रास होत आहे. यासाठी बोदवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार व कृषी अधीकाऱ्यांकडे निवेदन देत रासायनिक खत उपलब्ध व्हावे अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की,बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असून तालुक्यात कोणत्याच प्रकारचे खते उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. बोदवड तालुक्यातील काणत्याही कृषि केंद्रावर खतं उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला अजून त्याची खतांअभावी धावपळ होत आहे.तरि स्तरावरून शासन दरबारी पाठ पुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आपले स्तरावरून योग्य ते सहकार्य करून येत्या २ ते ३ दिवसात रासायनिक खते उपलब्ध करून मिळावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदन देतांना राष्ट्रवादी किसान सेल जळगाव जिल्हाउपाध्यक्ष वामनराव ताठे,नगरसेवक भरत अप्पा,राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष आबा पाटील,माजी सभापति किशोर गायकवाड़,राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर,मधुकर भाऊ राणे,डॉ.सेलचे डॉ काजळे,संजय भाऊ वराडे,जीवन राणे,रविंद्र भाऊ खेवलकर,मधुकर पाटिल,नईम खान बागवान,विजय चौधरी,किरण वंजारी,फिलाभाई राजपूत,लतीफ शेख,अनंदा पाटील यांच्या सहित राष्ट्रवादी कांग्रेस चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.