चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील खेर्डी खु. येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल दुपारी उघडकीस आली आहे. गोपीचंद भास्कर पाटील (वय-३८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खेर्डी खु. येथील गोपीचंद पाटील यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला दोरी बांधून त्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची थरारक घटना उघडकीला आली आहे. हि घटना ३ डिसेंबर रोजी दुपारी २ ते शनिवार, ४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने परिसरात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी मेहूणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सपोनि पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस नाईक प्रविण पाटील हे करीत आहेत.