नवी दिल्ली : देशात गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 4 हजारांनी घट झाली आहे. देशात 26 हजार 115 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 252 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.
गेल्या 24 तासात देशात 34 हजार 469 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 35 लाख 4 हजार 534 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 27 लाख 49 हजार 574 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 45 हजार 385 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 9 हजार 575 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 81 कोटी 85 लाख 13 हजार 827 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.