नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.
सोमवारी सकाळी आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 30,256 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 295 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. 43,938 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या 24 तासात देशात 43 हजार 938 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 34 लाख 78 हजार 419 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 27 लाख 15 हजार 105 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 45 हजार 133 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 18 हजार 181 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 80 कोटी 85 लाख 68 हजार 144 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.